Friday 24 March 2017

शतदा प्रेम करावे

….. शतदा प्रेम करावे!

          कवीवर्य मंगे पाडगावकर यांच्या  शब्दांतून गाण्याला जीवन जगण्याची उभारी मिळते. कारण प्राणीमात्रांमध्ये माणूस हा केवळ प्राणी म्हणून जगत नाही, तर त्याला निसर्गाकडून लाभलेल्या  विचारक्ती आणि तल्लख बुद्धीच्या बळामुळे त्याचे वेगळेपण स्पष्टपणे जाणवते.  डार्विनच्या उत्क्रांती वादानुसार विकासाच्या अनेक टप्प्यानंतर विकसीत जीव म्हणून माणूस भाव-भावना, जगण्यातील संवेदनशीलता, निरागस प्रेम, दया-करूणा अशा विविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे त्याची  समृध्द जीवन जगण्याची धडपड सतत सुरू असते, आणि यातच त्याचे श्रेष्ठत्व आहे.
असे असताना अविकसित प्राण्यांमध्येदेखील न आढळणारी आत्महत्या करण्याची अनैसर्गिक प्रवृत्ती अलौकिक विचारक्तीचे वरदान लाभलेल्या माणसात का आढळते, हा व्यथीत करणारा प्रश्न आहे.  माणुस अकाली जीवन संपवणारी आत्महत्या का करतो ? हे अद्याप न उलगडलेल कोड आहे. काल-परवा कौवाघ या 29र्षीय संगणक तंत्रज्ञाने केलेली आत्महत्या अशीच मनाला चटका लावणारी घटना आहे. त्यामुळे मन क्षणभर सुन्न झाले. पोलीस विभागाला उत्स्फुर्तपणे वेळोवेळी, निष्काम सेवा देणाऱ्या  या बुद्धीमान तरुणाने अचानक आपले जीवन का संपवावे ? हा माझ्या मनाला पडलेला प्रश्न आहे.
                आधुनिक धावपळीच्या आणि तणावग्रस्त जीवनशैलीवर समाज म्हणून आपल्याला उपाय शोधलाच पाहिजे. भारताला तरुणांचा देश म्हणून ओळखले जाते, त्याचा आपण अभिमानही बाळगतो.  मात्र त्याचवेळी बेरोजगारी, गरीबी, व्यसनाधिनता, गुन्हेगारी अशा विविध कारणांमुळे युवक हताश किंवा वैफल्यग्रस्त होतात. एकीकडे जगभर उच्चशिक्षित तंत्रज्ञ म्हणून भारतीय तरुण आपली ओळख निर्माण करीत असताना  कौशलसारख्या तरुणाचा अकाली मृत्यु निश्चिपणे हृदयाल चटका लावून जातो.
 दरवर्षी जगभरात 8 लाख लोक विविध कारणांसाठी आत्महत्या करतात, पैकी एकट्या भारतात ही संख्या दोन लाखाच्या घरात आहे. खरेतरं मानवी जीवन इतके कठोर आणि जगण्यास असह्य मानण्याचे कारण नाही. कारण एका निकोप दृष्टीकोनातुन आपण सभोवताली नजर टाकली तर, मानवी जीवन निखळ आनंद देणारी आणि जगाच्या समृद्धीमध्ये भर घालण्यासाठी मिळालेली एक सुवर्णसंधी असल्याचे दिसून येते. निक वुजिसीक नावाचा  हाता-पायांनी संपुर्ण अपंग असलेला ऑस्ट्रेलियनरुण परंतु मनाने अभंग असून, मागील 10 वर्षापासुन संपुर्ण जगाला, जीवन भरभरून जगण्याची प्रेरणा देत आहे. दोन्ही पाय गमावलेला न्युझिलंडचा एव्हरेस्ट विजेता असलेला, 56 वर्ष वयाचा, मार्क इंग्लीस असो किंवा रेल्वे अपघातात पाय गमावलेली, एव्हरेस्ट शिखर विजेती अर्निमा यांनी अनेक संकटावर मात करून जीवन जगण्याची प्रेरणा अनेकांना दिली आहे.
                स्वामी विवेकानंद यांनी म्हटले आहे, ‘मनाचा दुबळेपणा हा एकप्रकारे मृत्युच आहे. आणि आत्मविश्वासाने जीवनाला सामोरे जाणे ही एकप्रकारीची ताकद आहे.’  जन्माला येणे आणि मृत्यु या दोन गोष्टींवर आमचे नियंत्रण नसले तरी या दोन बिंदुंमधील आयुष्य कसे जगावे, हे संपुर्णपणे माणसाच्याच हातात असते. आजदेखील सीमेवरिल सैनिक मृत्युची कोणतीही भिती न बाळगता, देशासाठी आत्मसमर्पण करण्यास तयार असतात. त्याचप्रमाणे अनेक सामान्य माणसे आंधळी, अपंग, परिस्थितीने गरीब असतांना  किंवा कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराला सामोरे जावून परिस्थितीवर मात करतात आणि आपली वेगळी ओळख प्रस्थापित करतात.
समस्या आणि अडचणी यांना समोरे जावे लागत असतांना आपल्यातील तेज, सुप्त क्षमता बाहेर येत असतात. माणसाला अडचणी आणि समस्या असणे हे त्याच्या जिवंतपणाचे प्रतिक असते. मेलेल्या माणसाला कोणत्याही समस्या किंवा अडचणी नसतात. जर्मन तत्वज्ञ फ्रेड्रिक नित्षे असे म्हणाला होता की, ‘जीवन का जगावे हे ज्याला कळले तो जीवन कसे जगावे हेदेखीशोधून काढतो.’  डॉ. व्हिक्टर फ्रॅंन्कल या यहुदी मानसोपचारतज्ज्ञाने  दुसऱ्या महायुद्धाच्या संदर्भात  अत्यंत प्रतिकुल परिस्थीतीतदेखील जीवनाला अर्थ देता येतो.हा संदेश ‘अर्थपुर्ण जीवनाचा शोया पुस्तकांद्वारे जगाला दिला.
                 ‘जगण्यात मौज आहे’ असे कोणीतरी म्हटलयं. ‘संघर्ष हाच जगण्याचा मुलमंत्र असे ब्रीद घेवून जणू शेकडो बालके फुटपाथवर दिवस-रात्र काढत जगत असतात. कोणी अंध, कोणी अपंग रेल्वेमध्ये मरणयातना सोसतं पण जगण्याच गाणं गातच असतोच की. सभोवतालचे हे जीवन जाणिवेने पाहिले की आत्महत्येची कल्पना मनात येणार नाही.
 कोळसा खाणीत काम करणारे मजुर, रूग्णालयांमध्ये दिवस-रात्र रूग्णसेवा देणारे कर्मचारी, गटारी उपसणारे हात, भट्टीत आयुष्य होरपळुन घेणारे हात पाहिले की, जगण्यात मौज आहे हेच सत्य असल्याचं जाणवत. आम्हा पोलीस दलातील अधिकाऱ्यां व कर्मचाऱ्यांना तर नेहमीच भाव-भावना बाजूला ठेवून, सगळ्या कौटूंबीक सुखांना दूर सारीत, रोजचं जीवन जगावं लागतं.  आमच्यासाठी रोज एक नवा दिवस असतो, एक नवे आव्हानं असत, लोकांच्या, समाजाच्या सुख-दुःखांशी समरस व्हायला आम्हाला आवडत. एक जीगर अंतरात असते, एक तळमळ असते. काम, मोहिम फत्ते झाली की पुन्हा रिलॅक्स नव्हे तर रिचार्ज होत असतो.
 आम्ही पोलीस दलाचे शूर सैनिक पण, आमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून जगणारा, काम करणारा जवान एकदम असा टोकाचा निर्णय घेतो तेव्हा काहीच सुचेनासे होत. वाटत त्यानं आपल्याजवळ मनं मोकळ केल नाही, त्याच्या सुरक्षेची आम्ही काळजी वाहण्यास कमी होतो काय ? निदान याची जाणीव तरी त्याला होती किंवा नाही ? असे अनेक प्रश्न मनात रूंजी घालतात, सतावतात. मन मोकळे करण्यासाठीच मग अशी भावनांना वाट करून द्यावी लागते.
यामुळे थोडे हलके वाटेलही पण एक युवक, जो देशासाठी काहीतरी करू शकला असता तो कायमचा दूर गेला त्याचे काय?  जेव्हा एखादा तरुण आत्महत्या करतो त्यावेळी तो त्याच्या संपुर्ण कुटूंबाला दुःखाच्या खाईत ढकलुन देतो. ज्या आई-वडिलांनी लहानपणापासुन त्याच्या संपुर्ण जडण-घडणीमध्ये आपले आयुष्य पणाला लावलेले असते, त्यांची कोणतीही जाणीव आणि जबाबदारी न ठेवता आई-वडिलांना आयुष्यभरासाठी दुःखी करून जातात. याचा आत्महत्येस प्रवृत्त होणारी मुले अजिबात विचार करित नाहीत असे लक्षात येते. त्यावरून एकप्रकारे आई-वडिलांच्या प्रति ही कृतघ्नता आहे हे तरूण मुलांनी लक्षात घेणे आवश्यक आहे.
            नुकत्याच 10 वी 12 वी च्या परिक्षा सुरू असुन त्यांच्या निकालावर आधारित काही मुले/मुली जीवनाची अखेरची परीक्षा समजता. आई-वडील आपल्या अतृप्त इच्छा आणि अतिमहत्वाकां पाल्याचा नैसर्गिक कल न पाहता आपल्या मुलांवर लादतात. त्यामुळे कोवळ्या वयाच्या मुलांवर आई-वडिलांच्या लादलेल्या इच्छांमुळे अनावश्यक ताण येतो आणि त्यामुळे पौगंडावस्थेतील मुले/मुली अविचारास प्रवृत्त होतात. याचा आई-वडिलांनी साकल्याने विचार केला पाहिजे.
खलील जिब्रान म्हणतो, ‘आपल्या मुलांचे आयुष्य म्हणजे आई-वडिलांना दुसऱ्यांदा जगण्याची संधी मिळालेली नसुन मुलांना त्यांचे आयुष्य त्यांच्या आवडी-निवडी, क्षमता, कल यानुसार घडवु देण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे. त्यांना नैसर्गिकपणे उमलु दिले पाहिजे’ हे भान पालकांनी ठेवले तर समस्येची तीव्रता कमी होऊ शकेल.
 त्याचप्रमाणे अलिकडे टिव्ही, मोबाईल, सोल मिडीया या भासमान साधनांवर कुटूंबातील सर्वच घटक अडकून पडल्यामुळे कौटूंबिक जिव्हाळ्याचा संवाद संपलेला आहे. त्यामुळे पालकांनी किमान दिवसातुन एकदा तरी कुटूंबासोबत जेवण घेण्याची सवय लावुन मुला/मुलींशी, त्यांच्या दिवसभरच्या प्रगतीवियी संवाद साधला पाहिजे. पालकांच्या निरोगी सुसंवादातुन मुला/मुलींची निकोप मानसिक जडण-घडण होते. त्यामुळे मुलांच्या मनावरील ताण-तणावाचा निचरा होतो. त्याचवेळी मुलांना चांगल्या साहित्याच्या वाचनाची सवय लावुन त्यांच्याशी त्यातील जीवन मुल्यांबाबत चर्चा केली पाहिजे. मुलांच्या मनावर निरोगी, निकोप जीवन मुल्यांचे महत्व बिंबवले पाहिजे.
            खुप काही विचारायला शिका, खुप काही बघायला शिका, खुप काही करायला शिका, खुप काही अनुभवायला शिका तर जग तुमचेच आहे. इतरांना सुख अन दुःख आपलं मानायला शिका जग तुमचेच होईल तुम्ही जगाचे व्हाल. जगण्यासाठी, या जगण्यावर, या जन्मावर तदाः काय हजार वेळा प्रेम करण्यासाठी तर आपला जन्म झाला आहे.
             जीवनात एखादया प्रसंगात अपय आले किंवा आपली महत्वकांक्षा आणि स्वप्न पुर्ण करतांना अपेक्षित य मिळाले नाही किंवा एकतर्फी प्रेमभंगातुन अथवा अन्य कोणत्यातरी कारणामुळे कोणी आपल्यास नाकारले याचा अर्थ जीवन संपले असा होत नसुन इतर व्यक्तीमत्वांच्या अस्तित्वाचा आणि अधिकाराचा आदर करी, संपुर्ण जीवनावर प्रेम करित आपण राखेतुन उठुन उभ्या राहिलेल्या फिनीक्स पक्षाप्रमाणे नवीन उमेदीने आणि उभारीने अर्थपुर्ण आयुष्य जगु कतो. हे तरुण वर्गाने कधीही विसरू नये. जीवन कष्टमय असले तरी निरोगी आणि निकोप, सकारात्मक, शावादी दृष्टीकोनातून जीवनाकडे बघितले तर जीवन खरोखर सुंदर असुन आपल्याला प्रत्येकक्षण भरभरून जगतांना जीवनाचा उत्सव साजरा करता आला पाहिजे.

-डॉ.रविंद्र कुमार सिंगल,  पोलीस आयुक्त नाशिक

No comments:

Post a Comment