वसतिगृहात प्रवेश
न मिळालेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी
भारतरत्न
डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
नाशिक दि.5-इयत्ता अकरावी, बारावी आणि त्या नंतरच्या व्यावसायिक, तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या, परंतु कोणत्याही शासकीय किंवा महाविद्यालयाच्या वसतिगृहात
प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध
विद्यार्थ्यांना भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी थेट अनुदान उपलब्ध करून
देणाऱ्या ‘भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजने’ची सन 2016-17 पासून सामाजिक न्याय विभागाने सुरूवात केली आहे.
या योजनेसाठी विद्यार्थ्यांना दहावी, बारावी,
पदवी किंवा पदविका परिक्षेत 60 टक्क्यापेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे. या
प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा 50 टक्के गुण असणार आहे.
विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न 2 लाख 50 हजारपेक्षा जास्त नसावे.
विद्यार्थी बाहेरगावी शिकणारा असावा, अर्थात स्थानिक नसावा. गुणवत्तेनुसार
विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल. विद्यार्थी व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न
निर्वाह भत्ता योजनेचा लाभ घेत असल्यस त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
विद्यार्थ्यांनी आपले बँक खाते आधारकार्डशी संलग्न करून घेणे बंधनकारक आहे. सामाजिक न्याय विभागाच्या
वसतिगृहात वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांना ही योजना लागू नाही.
या योजनेंसाठी पात्र ठरणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध
प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे अनुदान देण्यात येईल.
या
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जाचा विहीत नमुना व सविस्तर माहिती https://mahaeschol.maharashtra.gov.in, https://sjsa.maharashtra.gov.in, https://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. विद्यार्थ्याचे
जातीचे प्रमाणपत्र ज्या जिल्ह्यातून निर्गमित करण्यात आलेले आहे, त्या जिल्ह्याच्या
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे समक्ष/टपालाद्वारे आवश्यक कागदपत्रासह 16 मार्च 2017 पर्यंत अर्ज दाखल
करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक
उपायुक्त काशिनाथ गवळे यांनी केले आहे.
----
No comments:
Post a Comment