Sunday 14 October 2018

विकासकामांचे भूमिपूजन


शेतकऱ्यांच्या विकासाकरीता मुलभूत विकासाला प्राधान्य-चंद्रकांत पाटील

          नाशिक, 14 : शेतकऱ्यांच्या विकासासाठी आणि आर्थिक उन्नतीसाठी रस्ते, पाणी आणि वीज या मूलभुत गोष्टी पुरविण्यास शासन प्राधान्य देत आहे,  असे प्रतिपादन राज्याचे महसूल, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
          अवनखेड येथील शेतकरी मेळावा व विविध विकासकामांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन, खासदार हरीश्चंद्र चव्हाण, आमदार जीवा पांडु गावीत, नरहरी झिरवाळ, मुख्य अभियंता हेमंत पगारे, अधीक्षक अभियंता रणजित हांडे, कार्यकारी अभियंता सुर्यकांत आहिरे, सरपंच नरेंद्र जाधव, लक्ष्मण सावजी आदी उपस्थित होते.

          श्री. पाटील म्हणाले, राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने चांगल्या दर्जाची कामे होत आहे. रस्त्यांच्या कामासाठी अंदाजपत्रकात भरीव तरतूद करण्यात आली आहे.  केंद्र शासनानेदेखील रस्ते विकासाकरीता एक लाख 6 हजार कोटीचा  निधी उपलब्ध करून दिला आहे.
महाराष्ट्रात दुष्काळ सदृश परीस्थिती असल्याने 172 तालुक्यात पंचनामा करण्यात येत आहे. लवकरच दुष्काळ घोषित करुन मदत दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.
          श्री. पाटील यांनी प्रधानमंत्री दत्तक ग्राम योजनेअंतर्गत अवनखेड गावात चांगली विकासकामे झाल्याबद्दल ग्रामस्थांचे कौतुक केले.  त्यांनी ग्रामपंचायत इमारतीची पहाणी करुन राज्यात अशा ग्रामपंचायत इमारती उभ्या रहाव्यात,असे कौतुगोद्गार काढले.

          खासदार चव्हाण यांनी दिंडोरी मतदार संघाच्या विकासकामांबद्दल माहिती देवुन प्रधानमंत्री दत्तक ग्राम योजनेअंतर्गत अवनखेड गावाने देशपातळीवर चांगली कामगिरी केल्याचे सांगितले. नाशिक-पेठ रस्त्याकरीता केंद्राने निधी मंजुर केला असून  लवकरच तो रस्ता पुर्ण होणार असल्याचे ते म्हणाले.
          यावेळी श्री.पाटील यांच्या हस्ते हायब्रीड ॲन्युईटी  कार्यक्रमांतर्गत पॅकेज क्र.54 नामपूर-सटाणा-कळवण-वणी तसेच नाशिक-दिंडोरी-वणी रस्त्याच्या कामाचे भूमीपुजन आणि अवनखेड येथील स्वामी पद्मानंद सरस्वती सभागृह आणि कादवा पर्यटन रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले.
00000



No comments:

Post a Comment