दारणा, गोदावरीकाठच्या
नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन
नाशिक, दि. 31:- सर्वोच्च
न्यायालयाच्या आदेशानुसार गुरुवार 1 नोव्हेंबर 2018 रोजी सकाळी 10 वाजता दारणा,
गंगापुर आणि मुकणे धरणातून जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्यात येणार असल्याने दारणा
व गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दारणा
व मुकणे धरणातून 2.04 टीएमसी आणि गंगापुर धरणातून 0.60 टीएमसी पाणी सोडण्यात येणार
आहे. दारणा धरणातून 11 हजार क्युसेक्स, मुकणे धरणातून 1 हजार क्युसेक्स आणि
गंगापुर धरणातून 3 हजार 500 क्युसेक्सने पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असल्याने कोणीही आंदोलन करून विसर्गास अडथळा आणू नये.
तसेच प्रवाह जास्त असल्याने नदीपात्रात उतरू नये. नदीपात्रात विद्युत पंप असल्यास
ते सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात यावे. कुठल्याही प्रकारची मालमत्ता अथवा जीवित हानी
झाल्यास जलसंपदा विभाग जबाबदार राहणार नाही. नदीकाठच्या नागरिकांनी विशेष दक्षता
घ्यावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता रा.शा.शिंदे यांनी केले आहे.
----
No comments:
Post a Comment