Friday 28 December 2018

व्यक्तिमत विकास


नाशिक जिल्हा ग्रंथोत्सव 2018
व्यक्तीमत्व विकासासाठी तणावमुक्त जगणे आवश्यक-विवेक गायकवाड

नाशिक, दि. 28:- सभोवतालच्या पर्यावरणाचा परिणाम मानवी आयुष्यावर होत असून व्यक्तीमत्व विकासासाठी तणामुक्त जगणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ठाण्याचे अप्पर जिल्हाधिकारी विवेक गायकवाड यांनी केले.
मु.शं. औरंगाबाद सभागृहात नाशिक जिल्हा ग्रंथोत्सव 2018 समारोपप्रसंगी ‘व्यक्तिमत विकास’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाला निवृत्त न्यायाधीश प्रकाश मोरे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन जोपुळे, श्रीकांत बेणी आदी उपस्थित होते.
श्री. गायकवाड, म्हणाले, माणसाला आपल्या व्यक्तिमत्वाचा बाह्य विकासासोबतच आंतरिक विकास आवश्यक आहे. स्वत:ला आहे तसे स्वीकारुन व स्वत:च्या विकासाचा मार्ग निवडा. स्वत:ला घडवत असतांना दुसऱ्याच्या आयुष्याचा अभ्यास करण्याच सल्ला त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. तसेच आयुष्यात येणारी प्रत्येक संधी शेवटची आहे असे समजून काम करावे असेही ते यावेळी म्हणाले.
विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी चांगले ग्रंथांचे व गोष्टींचे जतन करावे . आयुष्यात महत्वाकांक्षी राहून आत्मविश्वासाने कार्य केल्याश यशस्वी होता येते. जीवनावर स्वत:चे नियंत्रण ठेवावे, असेही ते यावेळी म्हणाले.----

No comments:

Post a Comment