Tuesday 30 January 2018

विधी सेवा शिबीर


         गरजू नागरिकांपर्यंत योजनांची माहिती पोहोचणे गरजेचे- सुर्यकांत शिंदे   
                                              
                   
             नाशिक दि.30- समाजातील दुर्बल घटक आणि गरजू नागरिकांपर्यंत विविध शासकीय योजनांची माहिती पोहोचणे गरजेचे असून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने आयोजित केलेल्या मेळाव्याच्या माध्यमातून अशी माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे प्रतिपादन  प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश सुर्यकांत शिंदे यांनी केले.

           विधी सेवा शिबीर शासकी योजनांच्या मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास महानगरपालिका आयुक्त अभिषेक कृष्णा, पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, जिल्हा बार असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. नितीन ठाकरे, जिल्हा सरकारी वक अजय मिसर आदी उपस्थित होते.

           श्री. शिंदे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या सुचनेनुसार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. शासकीय योजनांची माहिती नागरिकांना देाताना अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यांच्या समस्या समजावून घेत त्यांना मार्गदर्शन करावे. एकाच ठिकाणी माहिती उपलब्ध होत असल्याने शासकीय योजना खऱ्या अर्थाने गरजूंपर्यंत पोहोचतील, असे त्यांनी सांगितले.     

          डॉ. सिंगल म्हणाले, ग्रामीण भागातील गरीबांना त्यांच्यासाठी असलेल्या योजनांची माहिती कोठे मिळेल हे माहित नसल्यामुळे त्यांना योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहावे लागते.  मेळाव्याचा  त्यांना योजनांची माहिती मिळेल आणि त्याचा लाभ घेता येईल. ही माहिती अधिकाधीक नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.

           जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने बी.डी.भालेकर मैदान येथे आयोजित मेळाव्यात नागरीकांना योजनांची माहिती देण्यासाठी शासकीय विभागांनी 29 स्टॉल्स उभारण्यात आले. यामध्ये पोलिस आयुक्तालय, महिला व बाल कल्याण विभाग, जिल्हा परिषद, महानगरपालिकेचे शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, कृषी विभाग, प्रधानमंत्री आवास योजना, कौशल्य विकास विभाग, जिल्हा अधिक्षक डाकघर(पोस्ट विभाग), जिल्हा पोलिस अधिक्षकपशूसंवर्धन विभाग आदीं विभागांनी स्टॉल उभारले आहेत. स्टॉल्सच्या माध्यमातून योजनांची माहिती देण्यात आली.
00000000


No comments:

Post a Comment