Monday 29 January 2018

पतसंस्था शाखा उद्घाटन

पतसंस्थांनी नागरिकांचा विश्वास संपादन करावा-गुलाबराव पाटील
 
नाशिक, दि. 29 : पतसंस्थांनी पारदर्शक कारभाराद्वारे नागरिकांचा विश्वास संपादन करावा व ग्रामीण भागाच्या विकासासाठी योगदान द्यावे, असे प्रतिपादन राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
          लासलगाव ग्रामीण बिगरशेतकरी सहकारी पतसंस्था मर्यादीत येवला शाखा उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला नगराध्यक्ष बंडुशेट शीरसागर, पंचायत समितीचे सभापती रुपचंद भागवत, कल्याणराव पाटील, दादाजी जाधव, माणिकराव शिंदे, मोतीराव पवार, अंबादास बनकर, राजेंद्र लोणारी आदी उपस्थित होते.

          श्री.पाटील म्हणाले, पतसंस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागात वित्तपुरवठा सुलभतेने होतो. पतसंस्थेतील रोजच्या बचतीमुळे ठेवीदारांना बचतीची सवय लागते आणि प्रसंगी बचतीचा उपयोग गरजा भागवण्यासाठी करता येतो. पतसंस्था चांगल्यारितीने चालण्यासाठी पतसंस्था आणि ठेवीदारांनी परस्पर सहकार्याची आणि विश्वासाची भावना ठेवणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
          राज्यात एक लाख 92 हजार सहकारी संस्था कार्यरत असून ग्रामीण विकासासाठी त्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचेही श्री.पाटील म्हणाले.


----

No comments:

Post a Comment