पालकमंत्री गिरीष महाजन यांचे शहीदांच्या कुटुंबियासह स्नेहभोजन
नाशिक दि.26: भारतीय प्रजासत्ताकाच्या 68 व्या वर्धापन दिनानिमित्त देशासाठी बलिदान केलेल्या जवानांचे माता-पिता,वीर
पत्नी व शहीदांच्या कुटुंबियांसमवेत पालकमंत्री गिरीष महाजन यांनी स्नेहभोजन घेऊन चर्चा
केली. प्रशासनाच्यावतीने शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी विशेष स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले
होते.
याप्रसंगी महापौर रंजना भानसी, आमदार
बाळासाहेब सानप, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मनपा आयुक्त अभिषेक कृष्णा, स्थायी
समिती अध्यक्ष शिवाजी गांगुर्डे उपस्थित होते.
जिल्हाभरातून आलेल्या शहीदांच्या कुटुंबियांनी मंत्रीमहोदयांशी संवाद साधला. मंत्री
श्री.महाजन यांनी या कुटुंबियांच्या विविध समस्या व म्हणणे ऐकून घेऊन त्यावर तातडीने कार्यवाही
करण्याच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुचना दिल्यात. यावेळी शहीद यशवंत ढाकणे, यांचे
वडील अर्जुन ढाकणे, तळेगांव दिंडोरी, शहीद शंकर शिंदे यांची वीरपत्नी सुवर्णा
शिंदे, वडाळी भोई, वीरपत्नी भागुबाई दराडे,गोवर्धन गंगापुर, वीरपत्नी कमल लहाने,
मापारवाडी सिन्नर आदींसह 35 शहीदांचे कुटुंबीय उपस्थित होते.
----
No comments:
Post a Comment