Monday 29 January 2018

सायबर सुरक्षितता

सायबर सुरक्षितते जनजागृती आवश्यक-रवींद्रकुमार सिंगल
                                                       

नाशिक दि.29 – माहिती तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे 'सायबर सुरक्षितता' हा विषय समाजातील सर्व घटकांसाठी महत्वाचा असून त्याबाबत अधिकाधीक जनजागृती होण्याच्यादृष्टीने माध्यमांचे सहकार्य महत्वाचे आहे, असे प्रतिपादन पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी केले.
           नाशिक पोलिस आयुक्तालय जिल्हा माहिती कार्यालय यांच्यावतीने पत्रकारांसाठी आयोजितसायबर सुरक्षितताया विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, लक्ष्मीकांत पाटील,श्रीकृष्ण कोकाटे, माधुरी कांगणे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे, सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुटेमाहिती अधिकारी किरण वाघ तसेच पत्रकार, पत्रकारीतेचे विद्यार्थी आदी उपस्थित होते.

          श्री.सिंगल म्हणाले, सध्या मोठ्या प्रमाणात ऑनलाइन शॅापींग, ऑनलाइन बॅंकिंगचे व्यवहार होत आहेत. यासाठी स्मार्ट फोन, संगणक या माध्यमांचा वापर होत  आहेसमाजातील ज्येष्ठ नागरीक, महिला, विद्यार्थी, युवक हे याद्वारे मोठ्या प्रमाणात व्यवहार करत असताना -प्रणालीचा जबाबदरीपूर्वक उपयोग करणे गरजेचे आहे. या  व्यवहारांमध्ये पुरेशी काळजी घेतली जात नाही असे दिसून आले आहे. ऑनलाइन व्यवहार करताना सावधानता बाळगण्याची गरज असून नागरींकांमध्ये याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

           ते म्हणाले, ऑनलाइन व्यवहारांमध्ये फसवणूक झाल्याने नागरीक गुन्हे नोंदवण्यासाठी पुढे येतात. यासाठी विशेष सायबर पोलिस स्टेशनची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे अशा गुन्ह्यांचा लवकर सोडवणूक करता येते आहे. व्हॉटस् ॲपचा माध्यमातून महिलांना त्रास देणाऱ्या गुन्हेगारास सायबर शाखेने शोधून राजस्थानमधून अटक करण्यात आली, यामुळे पिडीत महिलांना दिलासा मिळाला. सायबर शाखेची कामगिरी महत्वपूर्ण ठरत असून राज्यात नाशिक पोलिस आयुक्तालयाची कामगिरी चांगली असल्याचे त्यांनी सांगितले.
            सायबर सुरक्षिततेबाबत होणारी कार्यशाळा हा चांगला उपक्रम असून जिल्हा माहिती कार्यालयाच्या सहयोगाने जनजागृतीसाठी पुढेदेखील अशा कार्यशाळांचे आयोजन केले जाईल, असे श्री. सिंगल म्हणाले

            याप्रसंगी भूषण देशमुख यांनी  डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर, त्यामध्ये असणारे धोके, ऑनलाइन व्यवहार करताना घ्यायची काळजी आदी बाबींवर सादरीकरण केले. यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. मोबाईलचा वापर करताना अनावश्यक अप डाउनलोड करू नये, आपला पासवर्ड परिचित व्यक्तीलाही सांगू नये, फसव्या मेलपासून सावध राहावे, चांगल्या दर्जाची संरक्षण यंत्रणा राबवावी, संगणकावरील माहितीचे नियमित बॅकअप घ्यावे, अशी माहिती त्यांनी दिली. कार्यशाळेच्या माध्यमातून मिळणारी माहिती उपस्थितांनी नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी केले.
                                                           00000000

No comments:

Post a Comment