सेवा भावनेने काम केल्यास विकास शक्य - गुलाबराव पाटील
नाशिक, दि.30:- सार्वजनिक जीवनात सेवा भावनेने काम केल्यास गाव आणि
परिसराचा वेगाने विकास शक्य आहे, असे प्रतिपादन राज्याचे सहकार राज्यमंत्री
गुलाबराव पाटील यांनी केले.
सोमवारी रात्री चांदगिरी ग्रामपंचायत येथील विविध विकास
कामांचे भुमिपुजन व लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार योगेश घोलप, आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषदेच्या
अध्यक्षा शितल सांगळे, बबनराव घोलप, विजय
करंजकर, सरपंच नंदाताई कटाळे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना, सेवा
भावनेने विकासाची कामे केल्यास जनतेचा विश्वास संपादन करता येतो. गावातील विकास
पाहिल्यावर याची प्रचिती येते, असे राज्यमंत्री श्री.पाटील म्हणाले. त्यांच्या
हस्ते सभामंडपाचे उद्घाटन करण्यात आले. गावातील विकासकामांच्या गुणवत्तेचेही
त्यांनी कौतुक केले.
-----
No comments:
Post a Comment