Wednesday 28 September 2016

रोहयो अंतर्गत फळबाग लागवडीचा समावेश
            नाशिक दि. 28- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत आंबा, बोर, आवळा, डाळिंब, संत्रा पुरक फळपिकांचा समावेश करुन शेतकऱ्यांच्या मागणीनुसार घन पद्धतीने लागवडीकरीता तसेच कलमे रोपे लागवडीचे प्रति हेक्टरी आधिक सुधारित मापदंडास शासनाने मान्यता दिली आहे.
            फळबाग लागवड कार्यक्रमामुळे लाभार्थ्यांचे उत्पन्नात वाढ होउन सहभागी लाभार्थ्याचे जीवनमान उंचावण्यास मदत होत असल्याने वैयक्तिक लाभाच्या योजनेअंतर्गत शासनाने ही योजना सुरू केली आहेफळबाग लागवडीच्या कामाकरीता कृषि विभाग अंमलबजावणी यंत्रणा म्हणुन कार्यरत राहणार असून तालुका कृषि अधिकारी यांना शासननिर्णयाने कार्यक्रम अधिकारी म्हणुन घोषित केले आहे.  
मस्टर निर्गमित करणे, भरणे, पारीत करणे, आणि कुशल / अकुशल बाबींचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेतांत्रीक मान्यता देण्याचे अधिकार तालुका कृषि अधिकारी प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार उपविभागीय कृषि अधिकारी यांना देण्यात आले आहेत.
            फळपिकांच्या मजूरी आणि सामुग्रीसाठी तिसऱ्या वर्षापर्यंत आंबा कलमासाठी हेक्टरी 400 झाडांसाठी 1 लाख 87 हजार 570 रुपये, डाळींब कलमे हेक्टरी 740  झाडांसाठी 2 लाख 20 हजार 149 रुपये, आवळा कलमे हेक्टरी 277 झाडांसाठीलाख 60 हजार 19 रुपये, आवळा कलमे हेक्टरी 150 झाडांसाठी 75 हजार 715 रुपये आणि बोर रोपे  हेक्टरी 277 रोपांसाठीलाख 4 हजार 510 रुपये अनुदान मिळणार आहे.
            शेतकऱ्यांनी आपले कार्यक्षेत्रातील कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधून मग्रारोहयो अंतर्गत फळबाग लागवड योजनेत सहभागी व्हावे,   असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक नाशिक यांनी केले आहे.
00000


No comments:

Post a Comment