Wednesday 28 September 2016


मुद्रा योजने अंतर्गत कृषीपूरक व्यवसायासाठी देखील कर्ज
नाशिक,दि. 28: प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत चालू आर्थिक वर्षापासून कृषीपूरक व्यवसासासाठी देखील कर्ज उपलब्ध होणार आहे.
मत्स्यपालन, कृषी उत्पादनावर आधारीत उद्योग समूह, पोल्ट्री, पशुपालन, दुग्ध व्यवसाय, मासेमारी, कृषी उद्योग केंद्र, न्न कृषी प्रक्रीया उद्योग आदी उत्पन्न वाढविणाऱ्या व्यवसायांचा यात समावेश करण्यात आला आहेकेवळ पीक कर्ज किंवा सिंचनासारख्या सुविधांचा यात समावेश नाही. परिपूर्ण अर्जासाठी 5 लाखापर्यंतच्या प्रकरणांना दोन आठवड्यात आणि त्यावरील कर्जास तीन आठवड्यात निकाली काढणे आवश्यक आहे. अर्ज नाकारल्यास अर्जावर कारणांची नोंद करण्यात येणार आहेरिझर्व्ह बँकेच्या सुचनेप्रमाणे अग्रणी बँकेकडून संबंधित अधिकाऱ्यांना याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत विविध कौशल्य प्राप्त करणाऱ्या युवकांनादेखील या योजनेचा लाभ दिला जात आहे. जिल्ह्यातील गरजा ओळखून त्याप्रकारचे उत्पादन करणाऱ्या नव्या उद्योजकांसाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 83 हजार 629 उद्योजकांना 280 कोटी 52 लाखाचे कर्ज मंजूर करण्यात आले असून 275 कोटी 62 लाख वितरीत करण्यात आले आहे. त्यापैकी उद्योगाची सुरूवात करणाऱ्या शिशू घटकांची संख्या 80 हजार 562 आहे. राज्यात मुद्रा योजने अंतर्गत  सर्वाधिक कर्जाचे वितरण करणाऱ्या जिल्ह्यात पुणे, नागपूर, मुंबई आणि कोल्हापूरनंतर नाशिकचा क्रमांक आहे.
होतकरू आणि यशस्वी उद्योजक होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या युवकांना उद्योग-व्यवसायासाठी या योजनेमुळे प्रेात्साहन मिळते आहे. यापुढील काळात विविध कौशल्य प्राप्त करणारे तरुण आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत ही योजनेची माहिती पोहोचविण्यात येणार आहे. अर्जदाराने बँकेत संपर्क करण्यापूर्वी व्यवसाय निश्चिती करून व्यवसायानुरूप जागा, प्रशिक्षण, तांत्रिक अथवा उद्योजकता विकास, व्यवसायास लागणारे विविध परवाने, प्रकल्प किंमत आदी बाबींची खात्री करून घेणे आवश्यक आहे.

00000

No comments:

Post a Comment