स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी मतदार नोंदणीचे आवाहन
नाशिक, दि. 14: भारत निवडणुक आयोगाने 16 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर 2016 या कालावधीत मतदार याद्यांचा पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला असून 1 जानेवारी 2017 रोजी वयाची 18 वर्षे पुर्ण करणाऱ्या पात्र नागरिकांनी मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.
मतदार यादीत नाव नोंदविलेल्यसा मतदारांनाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदान करता येणार आहे. त्यासाठी नवीन नावे नोंदविणे, नावामध्ये दुरुस्ती, दुबार किंवा मृताचे नाव वगळण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. नागरिकांनी तहसील कार्यालयात जावून मतदार नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
-----
No comments:
Post a Comment