Thursday 20 September 2018

इमारत भूमिपुजन


                      ग्रामीण भागाच्या विकासात सहकारी पतसंस्थांची भूमीका महत्वाची
                                                                                                 -गुलाबराव पाटील


नाशिक दि.20  - जिल्ह्याने सहकार क्षेत्रात चांगली कामगिरी केली असून ग्रामीण भागाच्या विकासात सहकारी बँका व पतसंस्थांची मोलाची भूमीका आहे, असे प्रतिपादन राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
चांदवड येथील दि.चांदवड मर्चंन्टस को-ऑप.बँकेच्या नियोजित प्रशासकीय इमारतीच्या भूमिपुजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा रेखाताई गवळी, माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ भंडारे, जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने, तहसिलदार शरद मंडलिक, स्वामी जयदेवपुरीजी महाराज, मर्चंन्ट बँकेचे, चेअरमन जगन्नाथ राऊत आदी उपस्थित होते.

श्री.पाटील म्हणाले, सहकारी क्षेत्र अनेक बदल स्वीकारत असून येत्या काळातदेखील जिल्ह्याच्या विकासात सहकारी बँकांचे योगदान महत्वाचे राहील.  शेतकऱ्यांची काळजी घेणार बँक म्हणून मर्चंन्ट बँकांकडे पाहिले जात असल्याने चांदवड मर्चंट को-ऑप.बँकेने शेतकरी व व्यापारी वर्गाला सहकार्य करावे. बँकेने आपल्या ठेवी  100 कोटी ठेवींच्या घरात पोहचवाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. बँकींग क्षेत्रात मिळविलेल्या पुरस्काराबद्दल त्यांनी बँकेच्या सर्व सदस्यांचे अभिनदंन केले.
यावेळी चांदवड तालुक्यातील पतसंस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
**********

No comments:

Post a Comment