उत्कृष्ट
वाङ्मय निर्मितीसाठी राज्य पुरस्कार
नाशिक, दि.19:- मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष
2017 करिता राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या स्व.यशवंतराव चव्हाण राज्य
वाङ्मय पुरस्कारासाठी प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालय किंवा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि
संस्कृति मंडळाच्या कार्यालयात 1 ते 31 जानेवारी 2018 पर्यंत पाठविता येणार आहेत.
स्पर्धेसाठी 1
जानेवारी 2017 ते 31 डिसेंबर 2017 या कालावधीत प्रकाशित प्रथम आवृत्ती पुस्तके
पात्र ठरतील. स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका
सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर
इमारत, दुसरा मजला, सयानी रोड, प्रभादेवी मुंबई-400025 येथे किंवा जिल्हाधिकारी
कार्यालयात विनामूल्य उपलब्ध होतील.
महाराष्ट्र
शासनाच्या www.maharashtra.gov.in या
संकेतस्थळावर ‘नवीन संदेश’ या सदरात तसेच मंडळाच्या http://msblc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरदेखील नियमावली व प्रवेशिका
उपलब्ध होतील. प्रवेशिका 31 जानेवारी 2018 पर्यंत मंडळाच्या पत्त्यावर किंवा
जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवाव्यात.. प्रवेशिका पाठविताना बंद पाकीटावर
‘स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार 2017 साठी प्रवेशिका’ असा स्पष्ट
उल्लेख करावा. कालमर्यादेनंतर आलेल्या प्रवेशिका स्विकारल्या जाणार नाहीत, असे सचिव महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृति मंडळ यांनी कळविले आहे.
----
No comments:
Post a Comment