पोलीस वसाहतीत
स्वच्छता मोहिमेचे आयोजन
नाशिक दि. 2
-: राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त ‘स्वच्छ भारत’
अभियानांतर्गत नाशिक महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस आयुक्तालयातर्फे
पोलीस वसाहत येथे स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले.
पोलीस
आयुक्त रवींद्र सिंघल यांच्या हस्ते स्वच्छता मोहिमेचा
शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार
देवयानी फरांदे, पोलीस उपयुक्त विजय पाटील, महानगरपालिका विभागीय अधिकारी (पश्चिम
विभाग) नितीन नेर, उपअभियंता सचिन जाधव,
स्वच्छता निरीक्षक परमार, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता देवेंद्र
पवार, सहाय्यक अभियंता सचिन पाटील, शाखा अभियंता अजय देशपांडे आदी उपस्थित होते.
यावेळी श्रीमती फरांदे यांनी
डेंग्युचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वच्छता महत्वाची असल्याचे सांगून नागरिकांनी
परिसर स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, असे आवाहन केले.
महात्मा गांधींच्या विचारांचे
अनुसरण करून राष्ट्र स्वच्छ करण्यासाठी सर्वांचे एकत्रित प्रयत्न आवश्यक आहेत, असे
श्री. सिंघल यांनी सांगितले. शहर
स्वच्छतेसाठी समाजामध्ये जनजागृती आवश्यक
असून त्यासाठी विविध उपक्रम राबविणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
यावेळी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पोलीस वसाहत
परिसरात स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.
No comments:
Post a Comment