अनुसुचीत
जातीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना
नाशिक,
18 : इयत्ता अकरावी आणि बारावी आणि त्यानंतरच्या
व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये 2018-19 या शैक्षणिक वर्षात प्रवेश
घेतलेल्या तसेच
शासकीय वसतीगृहात पात्र असूनही प्रवेश न मिळालेल्या अनुसुचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी ‘डॉ. बाबासाहेब
आंबेडकर स्वाधार योजना' सुरू करण्यात आली आहे.
योजनेअंतर्गत शासकीय
वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी,
बारावी, पदवी, पदविका, व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षणासाठी भोजन, निवास व इतर सोई-सुविधांसाठी
रुपये 51 हजार अनुदान देण्यात येते. यासाठी विद्यार्थ्यांना दहावी, बारावी, पदवी, पदविका
परिक्षांमध्ये 50 टक्यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांनी आपले खाते आधारकार्डशी लिंक करुन घेणे बंधनकारक आहे. पालकांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख
रुपयापेक्षा
जास्त नसावे. 12 वी नंतर पदविका, पदवी
अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारा अभ्यासक्रम 2 वर्षापेक्षा कमी नसावा आणि
विद्यार्थ्याने मान्यताप्राप्त अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेला असावा. अनुसूचित जाती
व नवबौद्ध प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गुणमर्यादा 40 टक्के आहे. विद्यार्थी
जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी नाशिक मनपा हद्दीच्या 5 किमीच्या परिसरातील
महाविद्यालयात शिक्षण घेणारा असावा.
योजनेचा लाभ
घेण्यासाठी शहरासाठी भोजन भत्ता रुपये 28 हजार, निवासभत्ता रुपये 15 हजार,
निर्वाहभत्ता रुपये 8 हजार असे एकूण प्रती विद्यार्थी रुपये 51 हजार लाभाचे स्वरुप
आहे. वरील रकमेच्या व्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी
प्रतिवर्ष रुपये 5 हजार व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष रुपये 2 हजार
इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी अतिरिक्त स्वरुपात देण्यात येते, असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment