Thursday 17 August 2017

आढावा बैठक

 गावांना भेटी देऊन नियोजन करा-दादाजी भुसे 
 

                                                

          नाशिक, दि.16- मालेगाव तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने टंचाईला सामोरे जाणाऱ्या गावात अधिकाऱ्यांनी भेटी देऊन कामांचे नियोजन करावे, असे निर्देश ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी दिले.
            मालेगाव येथे आयेाजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी महापालिका आयुक्त संगिता धायगुडे, उपविभागीय अधिकारी अजय मोरे, अप्पर पोलीस अधिक्षक हर्ष पोतदार, तहसिलदार डॉ. सुरेश कोळी, गट विकास अधिकारी अनंत पिंगळे, कृषी अधिकारी गोकुळ अहिरे, आदी  उपस्थित होते.
             आठवड्यातून दोन दिवस गाव पातळीवर भेट देऊन विविध विभागांतर्गत कामांची नोंद घ्यावी. संबंधित तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकाऱ्यांनी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना श्री.भुसे यांनी दिल्या.        
            बैठकीमध्ये तालुक्यातील पिकस्थिती, पावसाअभावी नापेर क्षेत्र, पीक नुकसान, पुर्नपेरणी क्षेत्र व बियाणे मागणी बाबत कृषी विभागाने माहिती सादर केली. महसूल विभागाने पावसाचे प्रमाण, रोहयो, चारा टंचाईवरील उपाययोजना, अन्न सुरक्षा पत्रिका, अंत्योदय योजना, धान्य वाटप, संजय गांधी योजनांची माहिती दिली.  कर्ज माफी, पीक कर्ज वाटप, विविध गावांच्या पाणी पुरवठा योजनांचा तसेच अपूर्ण पाणी पुरवठा योजनांचा आढावा यावेळी घेण्यात आला.
             मालेगाव शहर हागणदारीमुक्त होण्यासाठी महानगरपालिकेच्या प्रयत्नांना मिळालेल्या यशाबद्दल मनपा आयुक्त संगिता धायगुडे यांचे श्री.भुसे यांनी अभिनंदन केले.   
                                                                   00000   


No comments:

Post a Comment