Wednesday 25 January 2017

राष्ट्रीय मतदार दिन

                       
                        सुदृढ लोकशाहीसाठी मतदान करणे गरजेचे- कान्हुराज बगाटे

          नाशिक दि. 25 :- सुदृढ लोकशाहीसाठी मतदारांची भूमिका महत्वाची असून मतदारांनी मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे यांनी केले.
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर,  उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रज्ञा बढे-मिसाळ, उपजिल्हाधिकारी डॉ.शशिकांत मंगरुळे, उपविभागीय अधिकारी राहूल पाटिल,  तहसीलदार गणेश राठोड आदि उपस्थित होते.

श्री.बगाटे म्हणाले, भारतातील निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि नि:पक्षपाती आहे. याचे श्रेय मतदारांना आहे. मतदान हा लोकशाही व्यवस्थेतील महत्वाचा पैलू आहे. मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी  निवडणूक आयोगातर्फे दरवर्षी मतदार दिनाचे आयोजन करण्यात येते. युवकांनी या उपक्रमात सहभागी होऊन मतदानाचे महत्व नागरिकांपर्यंत पोहोचवावे, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्य निवडणुक आयुक्तांच्या संदेशाचे वाचन करण्यात आले. प्रास्ताविकात श्री. मिसाळ यांनी मतदार दिन कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत माहिती दिली. याप्रसंगी मान्यवरांच्या उपस्थित मतदार जागृती चित्ररथाचे उद्घाटन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते नवमतदारांना मतदान ओळखपत्राचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरवातीस शासकीय कन्या विद्यालयाच्या विद्यार्थीनींनी पथनाट्याद्वारे मतदानाचा संदेश दिला. यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मतदान केंद्र अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. मतदार दिनानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध, रांगोळी स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना यावेळी पारितोषिक प्रदान करण्यात आलीत.
000000


No comments:

Post a Comment