Wednesday 25 January 2017

राष्ट्रीय मतदार दिवस मालेगांव

लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी युवकांनी मतदान करावे
                                               -जिल्हाधिकारी

          मालेगांव दि.25- लोकशाही बळकटीकरणासाठी युवकांनी मतदान करावे ,असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले.
मालेगांव येथील महाराजा सयाजीराव गायकवाड,महाविद्यालय येथे राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, तहसिलदार डॉ.सुरेश कोळी, प्रा.डॉ. सुभाष निकम, उपप्राचार्य डी.व्ही.ठाकूर, ए.एम.बिरारी, डी.एन. सोनवणे आदी उपस्थित होते.

श्री.राधाकृष्णन म्हणाले,  जनतेत मतदानांविषयी जागृती व्हावी व मतदानाची टक्केवारी वाढावी या उद्देशाने मतदार दिवसाचे आयोजन केले जाते. मतदान जागृतीत युवकांचा सहभाग महत्वाचा आहे.  18 ते 30 वयोगटातील प्रत्येक मतदार नोंदणी करून मतदान करावे. यामुळे लोकशाहीचे बळकटीकरण होईल. प्रत्येक तरुणाला पाच वर्षांनंतर ही संधी मिळत असल्याने अतिशय विचारपर्वूक आपले मतदान करावे , असे त्यांनी सांगितले.

मतदान प्रक्रियेत सर्वांचा सहभाग महत्वाचा असून प्रशासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय मतदार उपक्रमात सर्वांनी सहभागी होवून मतदार जागृतीच्या कामास सहकार्य करावे ,असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
महिला,तरुणांचा मतदानातील सहभाग वाढावा आणि नवीन मतदारांची नोंदणी व्हावी या उद्देशाने राष्ट्रीय मतदार दिवसाचे आयोजन करण्यात येते असे सांगून मतदारामध्ये मतदानाविषयी जागृती होवून मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी युवकांनी मतदान करावे, असे आवाहन श्री. स्वामी यांनी यावेळी केले.
कार्यक्रमात यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विद्यार्थी-विद्यार्थ्यांना  मतदानाची शपथ दिली. तसेच त्यांच्या  हस्ते नवमतदारांना मतदान ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी मतदार जागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमात महाविद्यालयातील शिक्षक,कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. 

No comments:

Post a Comment