Tuesday 24 January 2017

सक्षम करू या युवा मतदार

सक्षम करू या युवा मतदार

भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर लोकशाहीच्या माध्यमातून जनतेच्या आशा-आकांक्षाची पुर्तता करण्याचे अनेक स्तरावर प्रयत्न करण्यात आले. 'जनतेचे राज्य' ही संकल्पना स्विकारून जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून राज्य चालविले जात आहे. योग्य निर्णय प्रक्रीयेद्वारे देशाला प्रगतीच्या वाटेवर पुढे नेता यावे यासाठी जनतेने निवडलेले प्रतिनिधी सक्षम असणे गरजेचे आहे आणि त्यासाठी मतदारांनी निर्भयपणे तसेच विचारपूर्वक मतदान करणे तेवढेच आवश्यक आहे. यादृष्टीने मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी 25 जानेवारी हा दिवस 'राष्ट्रीय मतदार दिवस' म्हणून साजरा करण्यात येत आहे.
निवडणूका हा लोकशाही प्रक्रीयेचा कणा आहे. विशेषत: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये स्थानिक स्तरावरील समस्यांची सोडवणूक करण्यासाठी मतपेटीच्या माध्यमातून योग्य प्रतिनिधी निवडणे आवश्यक आहे. या निवडीवरच विकासाचे नियोजन आणि सामाजिक विकास अवलंबून असतो. म्हणून मुक्त आणि निर्भय वातावरणात मतदारांनी मतदान करायला हवे. निवडणूकांच्या वेळी कोणत्याही प्रलोभनाला किंवा दबावाला बळी पडता आपल्या मताधिकाराचा उपयोग करायला हवा. योग्य पद्धतीने केलेले मतदान आपल्या हक्काचे रक्षण करण्याच्यादृष्टीने टाकलेले पहिले पाऊल असते हे नेहमी  लक्षात ठेवायला हवे.
मतदानाच्यावेळी मतदार यादीत नावे नसल्याने मतदानाचा अधिकार बजावता आल्याचेही बऱ्याचदा निदर्शनास येते. वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यावर युवक-युवतींना मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी प्रोत्साहीत करावयास हवे. नोंदणीसाठी नेमका अर्ज कोठे करावा याची माहिती त्यांना उपलब्ध करुन दिल्यास वेळेवर नोंदणी होऊन मतदार यादीत नाव समाविष्ट होऊ शकेल. भारत निवडणूक आयोगाच्या या संकेतस्थळावरही नोंदणी संदर्भात सविस्तर माहिती मिळू शकते. तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेतही यासंदर्भात वेळोवेळी नोंदणीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध अभियानांची माहिती मिळू शकते.
निवडणूक आयोगाने मतदानातील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी निवडणूक ओळखपत्र तयार करण्याची विशेष मोहिम राबविली. मात्र अशा मोहिमेत 'शासनाचे काम' अशी  पद्धतीने याकडे लक्ष देता देशाप्रतीचे महत्वाचे कर्तव्य म्हणून या मोहिमेस आपला सहभाग नोंदविणे गरजेचे आहे. केवळ आपले ओळखपत्र करुन थांबता समाजातील इतरही घटकांना याविषयीची माहिती देण्यात सुजाण नागरिकांचा पुढाकार अपेक्षित आहे. महाविद्यालयातील युवक राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून अशा स्वरुपाचा जनजागृती उपक्रम प्रभाविपणे राबवू शकतात.
जनतेच्या प्रती उत्तरदायी असणारे सरकार निवडून देण्यासाठी मुक्त वातारणातील मतदान आणि त्यात अधिकाधिक नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. केवळ मतदान केल्याने असे सरकार निवडता येत नाही . तर मतदार नोंदणी, मतदान प्रक्रीया, उमेदवाराची माहिती, विविध पक्षांची धोरणे याविषयीदेखील मतदारांनी माहिती करून घेणे आवश्यक आहे. मतदार म्हणून आपल्याला असलेल्या अधिकारांबाबत जागरुक राहिल्यास देशातील लोकशाही व्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत होऊ शकेल. अशा स्वरुपाची जागृती घडवून आणण्यासाठीच निवडणूक आयोगातर्फे दरवर्षी 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने विविध मतदारजागृती उपक्रमांचेदेखील आयोजन करण्यात येणार आहे. हे उपक्रम यशस्वी करून देशाच्या लोकशाही व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी मतदार जागृतीच्या प्रयत्नात आपणही सहभागी होऊ या आणि मतदार नोंदणी प्रक्रीयेत सहभागी होऊन मतदानासाठी सज्ज होऊ या!

No comments:

Post a Comment