…आणि हास्य फुलले
प्रशासन चांदवडच्या रेणुका लॉन्स परिसरात सर्वत्र महिलांचा वावर दिसत
होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्सुकता होती. प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी समस्या
जाणून घेण्यासाठी येणार असल्याने चेहऱ्यावर आनंदही होता. निमित्त होते महिला सबलिकरण अभियानाचे….
महसूल
दिनानिमित्त राज्य शासनाच्यावतीने हे
अभियान राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग
म्हणून महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी
आणि शासनाच्या विविध योजना
त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी या कार्यक्रमाचे आयेाजन करण्यात आले होते. महाराजस्व
अभियानमुळे महिलांच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य या निमित्ताने पहायला मिळाले.
विभागीय आयुक्त
एकनाथ डवले यांनी महिलांना स्वावलंबी आणि सक्षम होण्याबरोबर मुलींनाही शिक्षण
देण्याचा संदेश दिला. आमदार डॉ.राहुल आहेर यांनी उपक्रमाचे कौतुक
करताना ‘बेटी बचोओ, बेटी पढाओ’ अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी
करण्याचे आवाहन केले. तर जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी
महिलांच्या आर्थिक उन्नतीवर भर दिला.
कार्यक्रमात प्रशासन राबवित असलेल्या
योजनांची माहिती महिलांना देण्यात आली. यामुळे शासनाच्या अनेक योजना खऱ्या अर्थाने
महिलांपर्यंत पोहोचल्या. तालुक्यातील एक हजारहून अधिक महिला कार्यक्रमात
सहभागी झाल्या होत्या. महाविद्यालयीन विद्यार्थिनीची हिम्बोग्लोबिन, शुगर, रक्तदाब तपासणी मोफत करण्यात आली. या तपासणीतही दीड हजार विद्यार्थिनी सहभागी झाल्या.
यावेळी आयोजित करण्यात आलेले प्रदर्शनही विशेष असेच
होते. प्रदर्शनाला महिलांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. प्रदर्शनात 20 ते 25
स्टॉल लावलेले होते. प्रत्येक स्टॉलवर महिलांसाठी असलेल्या योजना त्यासंबंधी माहिती
देण्यात आली. यात दिनदयाळ उपाध्याय
ग्रामीण कौशल्य योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय
ग्रामीण रोजगार हमी योजन, राष्ट्रीय ग्रामीण आजीविका
मिशन स्वच्छ भारत अभियान, सुकन्या समृद्धी योजना, भारतीय स्टेट बँकेचे विशेष
स्वर्णधारा अभियान, लक्ष्मीमुक्ति योजना, प्रतिसाद अॅप्स, डेंग्यु जनजागृती, शिक्षण विभागामार्फत मुलींसाठी
राबविल्या जाणार्या योजना, लेक वाचवा अभियान आदींना विशेष
प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमात 3122 दाखले, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजने अंतर्गत 16
धनादेश, संजय गांधी निराधार योजने अंतर्गत 24 मंजूरी आदेश, 300 शिधापत्रिका, नैसर्गिक
आपत्ती धनादेश, लक्षमी मुक्ती योजना अर्ज, कृषी विभाग येाजना अर्ज, मागेल त्याला शेततळे योजनेचे मंजूरी आदेश
आदींचे वाटप करण्यात आल्याने हा मेळावा खऱ्या अर्थाने महिलांसाठी उपयुक्त ठरला.
शिवाय वाहन परवाना, पोलीस ॲप, बँकांच्या येाजना आदींची माहिती यावेळी देण्यात आली.
शासकीय योजनांच्या लाभासाठी कार्यक्रमस्थळीस अर्ज स्विकारण्याची सुविधा
केल्याने महिलांनी समाधान व्यक्त केले. शासकीय योजनांचे धनादेश वितरणही
कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी महिलांना खऱ्या अर्थाने ‘शासन दारी’ आल्याचे समाधान मिळाले. हे समाधान त्यांच्या
चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होते.
अशा प्रकारच्या अभियानातून महिलांना
आपल्या हक्काची जाणीव होते आहे आणि त्यामुळे विविध योजनांचा लाभही घेणे सहज शक्य होते, ही रंजना बच्छाव
यांची प्रतिक्रीया बोलकी आहे. तर अलका शिंदे यांनी अभियानाच्या
आयोजनाबाबत शासनाला धन्यवाद दिले. हेच अभियानाचे यश होते. हा कार्यक्रम जिल्ह्याला मार्गदर्शक
असल्याचे मान्यवरांनी केलेले कौतुक उत्तम नियेाजनाची पावती देणारे होते.
(शब्दांकन- सुनिल पोळ, लेखक हे जिल्हा माहिती
कार्यालय नाशिक येथे आंतरवासिता करीत आहेत.)
No comments:
Post a Comment