Monday 28 January 2019

कृषी महोत्सव


सेंद्रीय शेतीचा प्रसार आवश्यक-श्रीपाद नाईक


          नाशिक दि.28: नागरिकांना सकस आणि रासायनिक पदार्थमुक्त अनन्‍ उपलब्ध करून देण्यासाठी सेंद्रीय शेतीचा प्रसार  आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.
डोंगरे वसतीगृह मैदान येथे आयोजित कृषी महोत्सवाला भेट प्रसंगी ते बोलत होते. यावेळी गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे, बीव्हीजी ग्रुपचे हणमंतराव गायकवाड आदी उपस्थित होते.
श्री.नाईक म्हणाले, शेतकऱ्याला अधिक लाभ मिळावा यासाठी सेंद्रीय शेतीकडे वळविणे आवश्यक आहे. आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सेंद्रीय शेती व औषधी वनस्पती उत्पादनाकडे वळविण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी मंत्रालयाच्या विविध योजना असून शेतमाल खरेदीची व्यवस्थाही त्यात आहे. कृषी महोत्सवाच्या माध्यमातून सेद्रीय शेतीला उत्तमप्रकारे प्रोत्साहन दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री.नाईक यांनी कृषी प्रदर्शनाला भेट दिली आणि विविध उत्पादनांची माहिती घेतली.
----

No comments:

Post a Comment