जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे
नागरिकांना सतर्कतेच्या सुचना
नाशिक, दि. 14:- हवामान खात्याने मध्य महाराष्ट्रात येत्या 24 तासात जोरदार पाऊस पडणार
असल्याचा इशारा दिला असल्याने जिल्हा आपत्ती
व्यवस्थापन विभागांतर्फे नागरीकांना सतर्क रहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
धरण परीसरात पडणारा पाऊस व धरणाच्या खालच्या बाजूस पडणाऱ्या पावसामुळे नाले, ओढे, ओहोळ, छोटी-मोठी गटारे, नदीपात्र यामध्ये पुराचे पाणी येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पावसाचेवेळी नागरिकांनी सतर्क रहावे. लहान मुले, विद्यार्थी, नागरिक यांनी पुराचे पाणी
पाहण्यासाठी जाऊ नये. तसेच नदी काठावर तसेच पुलांवर
गर्दी करु नये.
पुराच्या पाण्यातून
वाहने चालवू नयेत. वाहने, जनावरे यांना पुराचे पाण्यापासून
दुर ठेवावे. पुराच्या पाण्याचे
संपर्कात आलेले व उघड्यावरील अन्नपदार्थ खऊ नये. सर्व प्रकारच्या विद्युत तारा व विद्युत खांबापासून दूर रहावे. पाण्यातील विद्युत खांब, तारा व विद्युत उपकरणांना हात लावू नये.
पुराची ठिकाणे, पुलांवर, नदी, ओढे, नाले, धरणे, धबधबे इ. कोणत्याही धोकेदायक ठिकाणी सेल्फी काढण्यास जावू नये. धार्मिक यात्रा व पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रत्येक भाविक
आणि पर्यटकाने आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात पर्यटनाची माहिती द्यावी म्हणजे त्यांचे अडचणीच्या वेळी मदत करणे जिल्हा प्रशासनास
शक्य होईल.
No comments:
Post a Comment