भाम सिंचन प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्यास
प्राधान्
-डॉ. संजीवकुमार बालियान
-डॉ. संजीवकुमार बालियान
नाशिक दि.11- भाम धरण प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या पुनर्वसनातील
समस्या दूर करण्यास प्राधान्य देण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय जलसंपदा, नदीविकास व गंगा शुद्धीकरण राज्यमंत्री डॉ. संजीवकुमार बालियान यांनी केले.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत इगतपुरी तालुक्यातील भाम भाम प्रकल्पग्रस्तांशी
संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी आमदार निर्मला गावित, जलसंपदा विभागाच्या अधिक्षक
अभियंता अलका अहिरराव, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) मधुमती सरदेसाई, उपविभागीय
अधिकारी राहूल पाटील, माजी आमदार शिवराम झोले आदी उपस्थित होते.
डॉ.बालियान
म्हणाले, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून देशात 96 सिंचन प्रकल्प होत असून
त्यातील 26 सिंचन प्रकल्प महाराष्ट्रात आहेत. भाम धरण प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याबरोबरच प्रकल्पासाठी जमीन दिलेल्या
शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाला प्राधान्य देण्यात येईल. पुनर्वसित गावठाणामध्ये वीज,
पाणी पुरवठा, रस्ते, सार्वजनिक सभामंडप आदी सर्व पायाभूत सुविधा उभारण्यात येतील.
कामांच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड करण्यात येऊ नये आणि शेतकऱ्यांच्या समस्या
सोडविण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वत: लक्ष द्यावे, असे निर्देश त्यांनी दिले.
याप्रसंगी
आमदार श्रीमती गावित आणि उपस्थित आदिवासी शेतकरी, गावकरी, लोकप्रतिनिधी आदींनी
मंत्री महोदयांना समस्यांची माहिती दिली. डॉ.बालियान यांनी पुनर्वसित गावठाणात
उभारण्यात येणाऱ्या सभामंडप परिसरात वृक्षारोपण केले.
No comments:
Post a Comment