Saturday 2 June 2018

शेतकऱ्यांना आवाहन


शेतमाल विक्रीसाठी आणण्याचे शेतकऱ्यांना आवाहन
नाशिक, दि.2:- शेतकऱ्यांनी बाजार समितीती शेतमाल विक्रीसाठी अडथळा निर्माण केला जात असल्यास पोलीस सुरक्षा प्रदान करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांनी नि:संकोचपणे आणि कोणतीही भिती न बाळगता शेतमाल बाजार समितीती विक्रीसाठी आणावा,  असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना वाहनाने एकत्रितरित्या शेतमाल मुंबई, नाशिक अथवा नाशिकबाहेर अन्य ठिकाणी घेऊन जावयाचा असल्यान त्यासाठी सुरक्षा पुरविण्यात येणार आहे. तसेच बाजार समिती आवारात शेतमाल विक्रीसाठी व्यत्यय येऊ नये यासाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था करण्यात येत आहे. 
नागरिकांना भाजीपाला आणि शेतमाल उपलब्ध व्हावा यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी बाजारात आणावा. तसेच शेतमाल विक्रीत समस्या येत असल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे 1077 किंवा 0253-2317151 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी नाशिक यांनी केले आहे.
----

No comments:

Post a Comment