‘जलयुक्त’च्या कामांचा दर्जा चांगला ठेवा- दादाजी
भुसे
मालेगाव, दि. 10:- ‘जलयुक्त’ शिवार
अभियान आणि ‘ गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ या दोन्ही
योजनांची कामे उत्तम दर्जाची करावीत आणि गाव टंचाईमुक्त होईल यादृष्टीने नियोजन
करावे, असे निर्देश ग्रामविकास राज्यमंत्री
दादाजी भुसे यांनी दिले.
शासकीय विश्रमागृह
येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला उपविभागीय अधिकारी अजय मोरे,
तहसिलदार ज्योती देवरे, गट विकास अधिकारी आनंद पिंगळे, वन विभागाचे श्री.कांबळे, तालुका कृषी अधिकारी गोकुळ अहिरे आदी उपस्थित होते.
श्री. भुसे
म्हणाले, सन 2016-2017 मधील कामे अपूर्ण असल्यास मार्च 2018 अखेर ती पूर्ण करावीत.
तसेच 2017-18 चे कामाचे योग्य नियोजन करुन ती कामे तातडीने सुरु करण्यात यावीत. जलयुक्तच्या कामासाठी प्राप्त झालेला निधी वेळेत
खर्च होईल आणि कामांचा दर्जाही चांगला राहील याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी. टंचाईग्रस्त गावात सीएसआर अंर्तगत
जलयुक्तची कामे घेण्यात यावीत, असे त्यांनी
सांगितले. त्यांनी वन विभागाला सीसीटी आणि वनतळ्याचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना
दिल्या.
---
No comments:
Post a Comment