Tuesday 13 June 2017

फळपीक विमा योजना

हवामान आधारीत फळपीक विमा योजना जाहीर

    नाशिक, दि. 13 :-  प्रतिकुल हवामान घटकांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी हवामान आधारीत फळपीक विमा योजना जाहीर करण्यात आली असून योजनेत सहभागी होण्यासाठी फळबाग उत्पादक शेतकऱ्यांनी बँकेशी तसेच कृषि विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालकांनी केले आहे.
नाशिक जिल्ह्यातील डाळींब व पेरु फळपीकांसाठी इफको टोकीयो जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून योजना राबविण्यात येणार आहे. डाळींबसाठी प्रति हेक्टर 1 लाख 10 हजार रुपये एकूण विमा संरक्षित रक्कम असून हप्ता 5500रु. आहे. हप्ता भरण्याची अंतिम मुदत 14 जुलै 2017 आहे. जास्त पास फळ पक्वता ते काढणी अवस्थेसाठी कमाल नुकसान भरपाई मर्यादा 60 हजार प्रति हेक्टर असून विमा संरक्षण कालावधी 16 ऑक्टोबर ते 30 डिसेंबर 2017 आहे. विमासंरक्षण कालावधी 15 जुलै ते 30 डिसेंबर 2017 पर्यंत असून पावसाचे कमी अधिक प्रमाण, फळवाढीची अवस्था व फळपक्वतेच्या टप्प्यातील धोक्यानुसार नुकसान भरपाई देय रक्कम राहील. पेरु पीकासाठी प्रति हेक्टर 50 हजार रुपये विमा संरक्षित रक्कम असून हप्ता 2500रु आहे. हप्ता भरण्याची अंतिम मुदत 14 जून 2017 आहे.
यंदा विभागातील 24 तालुक्यातील 154 मंडळात राबविण्यात येणार असून शेतकऱ्यांनी एप्रिल ते जुलै या कालावधीत कर्ज मंजुर असेल अशा कर्जदार शेतकऱ्यांना सक्तीची तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ही ऐच्छीक स्वरूपाची  आहे.
डाळींब फळपीक विमा संरक्षण योजनेसाठी धुळे जिल्ह्यात रिलायन्स जनरल इंन्शुरन्स जळगाव जिल्ह्यात डाळींब, चिकु, मोसंबी व पेरु या फळपीकासाठी एचडीएफसी ईगो जनरल इंन्शुरन्स ही कंपनी आहे.  चिकु या फळासाठी विमा संरक्षित रक्कम 50 हजार रु.पर्यंत विमा हप्ता 2500 रु, मोसंबीसाठी 70 हजार रु. असुन त्यासाठी विमा हप्ता 3500 रु. विमा भरण्याची अंतिम मुदत 30 जून पर्यंत आहे. मोसंबी फळासाठी  विमा संरक्षीत रक्कम 70 हजार रु. प्रति हेक्टर आणि  विमा हप्ता 3500 रु. आहे.

00000

No comments:

Post a Comment