Monday 4 February 2019

रस्ता सुरक्षा अभियान


युवकांनी वाहतूक सुरक्षेचे दूत म्हणून कार्य करावे-रविंद्र सिंगल


          नाशिक दि.4: रस्ते अपघातामुळे होणारी मानवी जीवाची हानी टाळण्यासाठी युवकांनी वाहतूक सुरक्षेचे दूत म्हणून कार्य करावे आणि रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्ताने  वाहतूक नियमांची माहिती समाजापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल यांनी केले.

हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान (गोल्फ क्लब) येथे नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक शहर पोलीस, नाशिक ग्रामीण पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग, शालेय शिक्षण विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 30 व्या रस्ता सुरक्षा अभियानाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.



कार्यक्रमाला जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., पोलीस अधीक्षक संजय दराडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता हेमंत पगारे, प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक पी.जी.खोडसकर, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुरेश जगदाळे, पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे आदी उपस्थित होते.

श्री. सिंगल म्हणाले, वाहतूक सुरक्षेची जबाबदारी केवळ विशिष्ट विभागाची नसून समाजाचीदेखील आहे. रस्ता अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्या नागरिकांची संख्या भारतात अधिक आहे. शालेय विद्यार्थ्यानीछोटा पोलीसबनून  वाहतूक नियमांबाबत जागरूकता आणावी आणि अपघात टाळण्यासाठी पोलीस  दलाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

श्री. दराडे म्हणाले, रस्ता अभियांत्रिकी, शिक्षण आणि वाहतूक नियम हे रस्ता सुरक्षेचे प्रमुख तीन घटक आहेत. याबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न रस्ता सुरक्षा सप्ताहात करण्यात येणार आहे. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे आणि जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या हेल्मेट सक्तीला सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले.


सात दिवसाच्या रस्ता सुरक्षा अभियानातजीवनदूतही  संकल्पना राबविण्यात येत आहे. स्वच्छ आणि सुरक्षीत शहरासाठी नागरिकांनी सहाकार्य करावे, असे श्री.कळसकर यांनी प्रास्ताविकात सांगितले.

मान्यवरांच्या हस्तेजीवनदूतम्हणून काम करीत अपघातात सापडलेल्या नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या व्यक्तिंचा सत्कार करण्यात आला. यावेळी वाहतूक नियमांची माहिती देणारी घडीपत्रिका आणि जीवनदूत होऊ या रेया गिताच्या सीडीचे विमोचनदेखील करण्यात आले.

डॉ. शैलेंद्र गायकवाड आणि सहकाऱ्यांनीयमदूत की जीवनदूतया पथनाट्याद्वारे वाहतूक नियमांचे पालन करण्याचा संदेश दिला. यावेळी वाहतूक सुरक्षेवर आधारीत विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते.

-----

No comments:

Post a Comment