ग्रामीण
भागात कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन द्यावे-जिल्हाधिकारी
नाशिक, दि. 22: ग्रामीण भागात कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी बँकांनी
विशेष प्रयत्न करावेत आणि त्यासाठी आवश्यक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत जनतेला प्रशिक्षीत
करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय बँकर्स समितीच्या
बैठकीत ते बोलत होते.यावेळी मुख्य कार्यकारी
अधिकारी मिलिंद शंभरकर, समितीचे निमंत्रक तथा बँक ऑफ महाराष्ट्रचे विभागीय व्यवस्थापक
आर.एम.पाटील, रिझर्व्ह बँकेचे प्रतिनिधी सी.कार्तिक, लिड बँक मॅनेजर अशोक चव्हाण, आदी
उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, बँकांनी कॅशलेस व्यवहारासाठी
निवडलेल्या गावात शंभर टक्के खाते उघडून ते आधार क्रमांकाशी जोडण्यासाठी विशेष मोहिम
हाती घ्यावी. जनतेला डिजीटल व्यवहाराची माहिती देताना असे व्यवहार करण्यासाठी सुविधा
उपलब्ध करून द्याव्यात. फेब्रुवारी अखेरपर्यंत प्रत्येक बँकेने किमान दोन गावे ‘कॅशलेस’
करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सिन्नर तालुक्यातील दापूर येथील बँक ऑफ महाराष्ट्रने
गाव कॅशलेस करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.
जिल्हाधिकाऱ्यांनी विविध पीक कर्ज वाटप तसेच बँकाना
दिलेल्या उद्दीष्टांचा आढावा घेतला. तिसऱ्या तिमाहीतील पीक कर्ज वाटपाचे शंभर टक्के
उद्दीष्ट पुर्ण करावे, त्यासाठी कृषिपूरक व्यवसायांसाठी कर्जवाटपाकडे लक्ष द्यावे,
अशी सूचना त्यांनी केली. डिजीधन मेळाव्यासाठी बँकांनी पूर्व नियोजन करून अधिकाधीक व्यक्ती
मेळाव्याचा लाभ घेतील याकडे विशेष लक्ष द्यावे, असेही श्री.राधाकृष्णन म्हणाले.
बैठकीस विविध बँकांचे जिल्हा समन्वयक अधिकारी उपस्थित
होते.
-----
No comments:
Post a Comment