क्षयरोगाच्या उच्चाटनासाठी जनजागृतीवर भर द्यावा- राधाकृष्णन
बी.
नाशिक, दि.20 :- जिल्ह्यातून क्षयरोग संपूर्ण नाहीसा करण्यासाठी आशा सेविकांनी घरोघरी क्षयरोग तपासणी
आणि जनजागृतीवर भर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी केले.
जिल्हा
शासकिय रूग्णालय येथे क्षयरोग दैनंदिन उपचार पद्धतीच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद
शंभरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य आधिकारी डॉ.सुशिल वाकचौरे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, क्षयरोगाच्या रुग्णांचा शोध घेऊन त्यांना रोगाबाबत
माहिती देणे आवश्यक आहे. या गंभीर आजाराच्या नियंत्रणात आशा सेविकांची भूमीका
महत्वाची आहे. चांगले
काम करणाऱ्या आशासेविकांचा
सत्कार करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. औषधोपचारासाठी जिल्हा
नियोजन समितीच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच सहा
महिन्यानंतर स्वत: या मोहिमेचा आढावा घेणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.
श्री. शंभरकर यांनी जिल्हा क्षयरोगमुक्त आणि हागणदारीमुक्त करण्यासाठी
सर्वांनी एकत्रिपणे प्रयत्न करावे, असे आवाहन केले.
संसर्गजन्य असलेल्या गंभीर
क्षयरोगाच्या उच्चाटनासाठी वैद्यकीय
अधिकारी, कर्मचारी, आशा सेविका सर्व मिळून काम करतील, अशी ग्वाही
डॉ.जगदाळे यांनी दिली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हाधिकाऱ्यांच्या
हस्ते रूग्णांना औषधांचे वाटप करण्यात आले. क्षयरोगग्रस्त
रूग्णांना दरारोज उपचारांसाठी
आशासेविकांना
प्रशिक्षण देण्यात आले.
00000
No comments:
Post a Comment